HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस नेत्यांनाही चक्रीवादळाचा जबर फटका, नांदेडमध्येच थांबावे लागणार

मुंबई । काँग्रेसचे नेते तथा खासदार राजीव सातव हे अनंतात विलीन झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आज (१७ मे) दुपारी सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाचे सर्व बडे नेते हिंगोलीत दाखल झाले होते. मात्र, आता तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावरील सेवा स्थगित करण्यात आल्याने सर्व मंत्री आणि नेते नांदेडमध्ये अडकले आहेत.

खरंतर राजीव सातव यांच्या अंत्यसंस्कारानंतर हे सर्व मंत्री मुंबईकडे परतण्यासाठी निघाले. मात्र, तौक्ते चक्रीवादळामुळे आता या सर्व मंत्री आणि नेत्यांना नांदेडमध्येच थांबणे भाग पडले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार झिशान सिद्दीकी, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे या सर्व नेत्यांचा ह्यात समावेश आहेत.

मुंबईत सोमवारी (१७ मे) तौक्ते चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केले आहे. पहाटेपासूनच मुंबईसह परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ह्याच वातावरणामुळे वाहतुकीतही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावरून होणारी हवाई वाहतूक बंद करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच फटका काँग्रेसच्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही बसला असून त्यांना आता नांदेडमध्येच थांबावे लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमधील मालेगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी

News Desk

बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला राम राम!

News Desk

मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का लावा, अँड. आशिष शेलार यांची मागणी

swarit