HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’विरुद्ध काँग्रेसच्या ‘महापर्दाफाश सभा’

मुंबई | “संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि महापूरासारख्या आपत्तीत सापडलेले असताना आपत्तीग्रस्त जनतेला वा-यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच असा चंग बांधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस पक्ष राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार आहे”, असे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी (२६ ऑगस्ट) अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोझरी येथील सभेत “आम्ही प्रचंड विकास केला आहे”, असे म्हणत ‘वाद- विवादा’चे जाहीर आव्हान दिले होते. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान स्वीकारून दुस-याच दिवशीच प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले त्यांना जाहीर चर्चेसाठी तारीख ,स्थळ, आणि वेळ कळवण्याचे आव्हान दिले होते. हे प्रतिआव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्वीकारल्याने त्यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावरून ‘महापोलखोल’ सभा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. नाना पटोले आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ होईल, अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

7 एप्रिलनंतर शिवसेनेकडून मंत्रिमंडळात फेरबदल ?

News Desk

अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या…

News Desk

कांदा निर्यातीवरील अनुदानात ५ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk