HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसकडून ‘जंतर मंतर’ मैदानात आंदोलन, अधिवेशनात बऱ्याच अडचणी!

नवी दिल्ली | संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं असून त्यात अनेक महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे कृषी कायदे आणि साध्याच चर्चेत आलेलं पेगासस प्रकरण. अधिवेशनात विरोधकांकडून गोंधळ घालण्यात येत आहे आणि सरकारला चांगलंच पेचात पकडला आहे. बुधवारच्या विश्रांतीनंतर आज(२२ जुलै) पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सदनाच्या कामकाजाला सुरूवात झाली. मात्र, सकाळी ११.०० वाजता कामकाज सुरू होताच कृषी कायदे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेले मृत्यू तसंच पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज अवघ्या काही मिनिटांतच स्थगित करावं लागलं आहे.

जंतर मंतर मैदानात आंदोलन

काँग्रेस पक्षाकडून जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यात आलं आहे. सभेत मांडलेल्या मुद्यांवरून उत्तर देत नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी सगळेच सरकारकडे करत आहेत. शेतकरी बांधव या साठी आंदोलनं देखील करत आहेत. आज (२२ जुलै) शेतकऱ्यांकडून ‘किसान संसद’ भरवली गेलीय. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी २०० शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.

मोदींनी घेतली बैठक

संसदेचं काम सुरु होण्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोअर ग्रुप बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, कृषी मंत्री नरेंद्र तोमर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी तसंच पीयूष गोयल हेदेखील उपस्थित होते. संसदेतील रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात पाकिस्तानपेक्षाही उपासमारी वाढली !

News Desk

काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा, दिग्विजय सिंहांच्या भावाची मागणी

News Desk

“राज्यसभा निवडणुकीत ‘मविआ’चे सर्व उमेदवार विजयी होतील,” नाना पटोलेंचा विश्वास

Aprna