HW News Marathi
महाराष्ट्र

लोकांच्या मनात पुन्हा विश्वास जागविण्यासाठी काँग्रेसचा ‘महाराष्ट्र्र दौरा’

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रभर फिरून राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या तारखा देखील जवळपास निश्चित झाल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता काँग्रेसने देखील आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आता विधानसभेच्या दृष्टीने पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असणार असल्याची माहिती मिळत आहे.

कॉंग्रेसचा हा महाराष्ट्र दौरा राज्यातील लोकांच्या मनात कॉंग्रेसबद्दल पुन्हा विश्वास जागविण्यासाठी, त्याचप्रमाणे जनसंपर्क वाढवण्यासाठी असणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या या दौऱ्याला पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. तसेच येत्या १ ऑगस्टपासून काँग्रेसच्या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकास यात्रा देखील १ ऑगस्टपासूनच सुरु होईल, अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ या टॅगलाईनसह १ ऑगस्टपासून महाराष्ट्रभर विकास यात्रा काढणार आहेत.

शिवसेनेचा ‘जन आशीर्वाद दौरा’ अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘जनसंपर्क यात्रा’

राज्यातील आगामी विधानसभेसाठी एकीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रभर शिवसेनेचा जन आशीर्वाद दौरा सुरु आहे. तर दुसरीकडे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनसंपर्क यात्रा सुरु होणार आहे. त्याचप्रामणे राज्य सरकारने गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने देखील आपण महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का?”, शेळकेंचा पलटवार

News Desk

आव्हाड म्हणाले, “साहेब चाव्या तयार”; पवार म्हणाले, “लगेच कार्यक्रम करु”

News Desk

 ‘अनाथांची माय’ काळाच्या पडद्याआड! सिंधुताई सपकाळ यांचं निधन, सर्व स्तरांतून मोठी हळहळ

Aprna