HW News Marathi
महाराष्ट्र

“सरकारच्या बदनामीचे कटकारस्थान,” नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप तर दरेकरांचं उत्तर!

मुंबई। सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपा बदनामीची कटकारस्थान करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. भावना गवळी, अनिल देशमुख आणि अन्य नेत्यांना राजकीय हेतूने कटकारस्थान रचून बदनाम केल्या जात आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांची विरोधी पक्षनेत्यांबरोबर बैठक झाली होती, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केला आहे. नवाब मलिक म्हणाले, “काही आधिकारी ज्यामध्ये आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी जे या सरकारवर आरोप करत आहेत. यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आरोप करण्याआधी बैठक झाली होती. ठरवून कटकारस्थान करण्याचं काम भाजपाच्या माध्यमातून सुरु आहे. वेळ आली तर आरोप करणारे अधिकारी आणि विरोधीनेते कुठे भेटले, कसे भेटले याबाबत माहिती देऊ

तुमच्यावर सरकार म्हणून कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही

दरम्यान, नवाब मलिकांच्या आरोपाला विरोधीनेचे प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. “तुमच्यावर सरकार म्हणून कुठल्याही प्रकरचा विश्वास नाही. आपलं नियंत्रण नाही असं समजायचं का?, राज्यातील अधिकाऱ्यांनी सातत्याने राज्याच्या विकासाठी सरकार कोणाचेही असो त्याला समर्थन दिले आहे. व सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. पण तुमचे उद्देशचं या ठीकाणी जनहिताचे नसतील आणि व्यक्तिगत स्वार्थाचे काही निर्णय असतील तर अधिकारी अशावेळी मदत करत नसतात. तसेच जर चुकीचे होत असेल तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती जात असेल. मात्र ठरवून देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्याचे काही कारण नाही.” असे देरेकर म्हणाले.

“भाजपाच्या कुठल्याही नेत्याने सरकार पाडण्याच्या बाबतीच कुठलही वक्तव्य केलेलं नाही. या तिन पक्षांमध्ये ऐवढा चांगला समन्वय आहे. की तेच ऐकमेकांना कधी पाडतील हे आपल्याला कळणार नाही. सरकारमध्ये विसंवाद आहे, असंतोष आहे. त्यामुळे त्यानांच आपलं सरकार पडेल,” अशी भीती असल्याचे प्रविण दरेकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस… राणेंचा पवारांवर निशाणा

News Desk

स्वारातीम विद्यापीठाच्या एमएस्सी केमिकलची प्रवेश परीक्षा 17 जूनला 

News Desk

भिवंडीत आव्हाडांच्या मनाला येईल तसे अधिकारी बदलतात ! आणखी एक घटक पक्ष नाराज

News Desk