HW News Marathi
महाराष्ट्र

या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस… राणेंचा पवारांवर निशाणा

मुंबई | भाजप नेते निलेश राणे कायम सरकारला टार्गेट करताना दिसत आहेत. आता निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले आहे.जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री यांमी म्हटलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे.

“अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करतो”, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

 

निलेश राणेंनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. राणेंसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ८० तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते, असं पाटील म्हणाले होते. आता भाजपकडून होणाऱ्या या टीकांवर अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी नवाब मलिक याचं मोठं विधान!

News Desk

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा गेम प्लॅन तयार

News Desk

“…तर” राऊत म्हणतात अपना भी टाईम आयेगा !

News Desk