HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत दूषित पाणी पुरवठ्यामुळे काविळची साथ

मुंबई | मुंबईत सध्या अनेक ठिकाणी अपूर्ण आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे. विविध विभागात पाण्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे अनेक विभागात दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत आहे. यामुळे शहरात गॅस्ट्रो व काविळीची साथ पसरली आहे. मुंबईतील सरकारी रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात अनेक नागरिक भरती झाले आहेत. दूषित पाण्यासह खराब बर्फ व उघड्यावरच्या खाद्यपदार्थांमुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण पालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदवले आहे.

कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात अनेक रुग्ण दररोज मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या संबंधित रुग्णालयाच्या डीन. डॉ. पिंपळे यांना याबाबत विचारले असता, “ह्या संदर्भात आकडेवारी महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळेल. आम्ही याबाबत सांगू शकत नाही”, अशी माहिती दिली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मोठी समस्या असते. अस्वच्छ पाणी प्यायल्यामुळे काविळीचा धोका असतो. त्यामुळे, सध्या दूषित पाण्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तराखंडला १७,५०० कोटींची भेट!

Aprna

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसले यांना 10 दिवसांची CBI कोठडी

Aprna

मुंबईत २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत वाढ, ६ जणांच्या मृत्यूची नोंद!

News Desk