HW News Marathi
महाराष्ट्र

पंजाबमध्ये ‘कोरोना’चा पहिला बळी, तर आतापर्यंत देशातील चौथा बळी

मुंबई | देशात कोरोना बाधिताच्या मृत्यूचा आकडा चारवर गेला आहे. देशात कोरोनाग्रस्ताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाचा चौथा बळी पंजाबमध्ये झाला आहे. देशात पहिलात कर्नाटक, दुसरा दिल्ली, तिसरा मुंबई आणि चौथा पंजाबमध्ये मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशाता कोरोनाने चौथा मृत्यू झाल्याची माहिती जाहीर केली. पंजाबमध्ये मृत झालेला ज्येष्ठ नागरिक काही दिवसांपूर्वी ते जर्मनीहून इटलीमार्गे भारतात परतले होते.

भारतात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या १६७ वर गेली असून आतापर्यंत कोरोनाने देशात चार जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारच्या आदेशा दिला की, आज (१९ मार्च) तात्काळ सर्व सरकारी आणि खाजगी बस वाहतूक बंद ठेवली जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त उद्यापासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले. असून २० पेक्षा अधिक लोक एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाही. त्याशिवाय लग्न सभारंभ, हॉटेल, जिम, कोचिंग सेंटर, शाळा आणि कॉलेजही बंद ठेवण्यात येणार आहे.

देशात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • आंध्रप्रदेश – २
  • दिल्ली – ११
  • हरियाणा – १७
  • कर्नाटक – १५
  • केरळ – २७
  • महाराष्ट्र – ४९
  • ओडिशा – १
  • पुद्दुचेरी – १
  • पंजाब – २
  • राजस्थान – ७
  • तामिळनाडू – ३
  • तेलंगाणा – १३
  • चंदीगढमधील केंद्रशासित प्रदेश – १
  • जम्मू -काश्मीरमधील केंद्रशासित प्रदेश – ४
  • लडाख – ८
  • उत्तर प्रदेश – १७
  • उत्तराखंड – १
  • पश्चिम बंगाल – १

एकूण – १८१

कोरोनामुळे आतापर्यंत देशात कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – ११ मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (१) – १३ मार्च
  • मुंबई – ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – १७ मार्च
  • पंजाब – ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – १९ मार्च

एकूण – ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय संजय राऊतांचे हल्ले सुरूच!

News Desk

“सर्व चाव्या फडणवीसांकडे,तर मग पाठीत खंजीर का खुपसला?”, चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल

News Desk

मुख्यमंत्र्यांचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते – राधाकृष्ण विखे पाटील

News Desk