HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या 24 तासांत 43,733 नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात 43 हजार 733 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 930 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 733 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 930 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 47 हजार 240 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 6 लाख 63 हजार 665 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 99 हजार 534 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 4 हजार 211 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 59 हजार 920 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी, आयसीएमआरचा निष्कर्ष

देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात आयसीएमआऱच्या एका अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जर करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यत कमी होतो. तमिळनाडूच्या पोलीस दलातल्या एक लाख १७ हजार ५२४ जवानांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान लस घेतलेले जवान आणि लस न घेतलेले जवान यांच्यापैकी किती जणांचा करोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुरुवातीच्याच दिवसात एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करणारा दुसरा कोणता मुख्यमंत्री झाला नाही !

News Desk

चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

News Desk

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाचा ‘कोल्ड ब्लडेड खून’ ! शेलारांचा घणाघाती आरोप

News Desk