HW News Marathi
महाराष्ट्र

बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत

मुंबई | कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील सर्व खासगी दुकाने, आस्थापना ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले असले तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था यांना यातून वगळण्यात आल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सोयी बंद राहतील.

राज्यशासनाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित स्वतंत्ररित्या कार्य करणारे प्रायमरी डिलर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित बाजारपेठेत कार्य करणारे वित्तीय बाजारातील सहभागीदार यांना ३१ मार्च पर्यंतच्या खासगी आस्थापना बंदीतून वगळण्यात आले असून या वित्तीय संस्थांचे कामकाज सुरु असणार आहे. तसेच, २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे सकाळी ७ ते रात्री ९ वाजपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळे-नंदुरबारचा आजचा निकाल म्हणजे उद्याच्या राजकारणाची दिशा आहे –  प्रविण दरेकर

News Desk

हिंगणा विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

निर्बंध लावण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान

News Desk