HW News Marathi
Covid-19

उद्धवजी लाॅकडाऊनपेक्षा संचारबंदी करा !आव्हाडांची मागणी ..

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लाॅकडाऊन केला आहे आणि संपुर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र आज सकाळी जनता कर्फ्यु हटवल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांनी ठिकठिकाणी गर्दी करायला सुरूवात केली आहे. मुंबई,पुणे या ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळाली. वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरक्षेसाठी मुंबई-पुणे हायवेसुद्धा बंद करण्यात आला आहे.

आज लोकांनी केलेली गर्दी पाहता महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू करावी अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सध्या वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरू आहे ,त्या बैठकीत संचारबंदीचा निर्णय होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज पंजाबमध्ये संचारबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील गर्दी पाहता संचारबंदीचा निर्णय होऊ शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी , महाराष्ट्रात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु

Arati More

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही – मुख्यमंत्री

News Desk

PM Cares फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा, राज्यस्तरीय चौकशी करा !

News Desk