HW News Marathi
महाराष्ट्र

दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवाच्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडणार

पुणे | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने होत असून सार्वजनिक गणेशोत्सवास सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी स्वत;हून पुढाकार घेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध दगडूशेठ गणपती ट्रस्टनेही यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा होईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे, गेल्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडला आहे.

पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

यावेळी अशोक गोडसे म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून आपण सर्व उत्साहाच्या वातावरणात गणेश उत्सव साजरा करीत आलो आहोत. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी आहे. शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपण यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि मुख्य मंदिरात साजरा करीत आहोत. मंदिराच्या बाहेरून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणोशोत्सवात भाविक गणरायाच्या चरणी मोठ्याप्रमाणावर हार, फुले, नारळ आणि पेढे अर्पण करत असतात. मात्र यंदा या वस्तूंचा स्वीकार केला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, या उत्सव काळात मंदिरात अभिषेक, पूजा, आरती आणि गणेशयाग गुरुजी करणार आहेत. तर भाविकांच्या हस्ते दरवर्षी उत्सव मंडपाच्या ठिकाणी होणारे अभिषेक रद्द करण्यात आले आहेत. मात्र भाविकांनी नाव आणि गोत्र यांची ऑनलाईन नोंदणी केल्यास, गुरुजींमार्फत ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम देखील यंदा रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व दर्शनसुविधा आॅनलाईन
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अर्थवशिर्ष याविषयावर प.पू.स्वानंदशास्त्री पुंड महाराज यांचे निरुपण दिनांक ११ ते ३१ आॅगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता होणार आहे. याशिवाय स्वराभिषेक देखील दिनांक १८ आॅगस्ट पासून सकाळी आॅनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध कलाकार आपली कला श्रीं चरणी अर्पण करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती आॅनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी ७.३० व रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही

swarit

दाभोळकर हत्या प्रकरण | आणखी तिघेजण ताब्यात, स्फोटकांचा साठा जप्त

swarit

भवानीपूरमध्ये पोटनिवडणुकीत विजयी होत ममता बॅनर्जींनी कायम राखलं मुख्यमंत्रीपद!

News Desk