HW News Marathi
महाराष्ट्र

दलित संघटनांच्या भारत बंदला हिंसक वळण

दलित संघटनांच्या भारत बंदला देशात ठिकठिकाणी हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. देशभरात बंद दरम्यान चार जण ठार झाले तर अनेकजण जखमी झाले. नागपूरमध्ये बस जाळण्यात आली. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनाचे लोन पसरल्याचे दिसून आले.

सर्वोच्च न्यायालयाने अॅस्ट्रोसिटी कायदा सौम्य करण्याचा प्रयत्न सुरू केला असून यामुळे दलितांवरील अन्याय वाढतील, अशी भीती दलित संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा कायदा अधिक कठोर करण्याच्या मागणीसाठी आजचा बंद पुकारण्यात आला आहे. मध्यप्रदेश, बिहारा, राजस्थान महाराष्ट्र आदी राज्यात या बंदचे परिणाम दिसून आले. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

Aprna

रेस्टोरंट, मंदिरे पुन्हा सुरु करण्याबाबत चर्चा, मात्र लोकल रुळावर येण्यास वाट पाहावी लागणार

News Desk

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल!

News Desk