HW News Marathi
महाराष्ट्र

दलित संघटनांच्या भारत बंदला हिंसक वळण

दलित संघटनांच्या भारत बंदला देशात ठिकठिकाणी हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. देशभरात बंद दरम्यान चार जण ठार झाले तर अनेकजण जखमी झाले. नागपूरमध्ये बस जाळण्यात आली. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनाचे लोन पसरल्याचे दिसून आले.

सर्वोच्च न्यायालयाने अॅस्ट्रोसिटी कायदा सौम्य करण्याचा प्रयत्न सुरू केला असून यामुळे दलितांवरील अन्याय वाढतील, अशी भीती दलित संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा कायदा अधिक कठोर करण्याच्या मागणीसाठी आजचा बंद पुकारण्यात आला आहे. मध्यप्रदेश, बिहारा, राजस्थान महाराष्ट्र आदी राज्यात या बंदचे परिणाम दिसून आले. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू,१३ दिवसात १,४२९ गुन्ह्यांची नोंद

News Desk

प्रिया दत्त काँग्रेसच्या सचिव पदावरून पाय उतार

swarit

‘कास्टिंग काऊच करणाऱ्यांना अटकेची मागणी’, तर राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ तरुणींचं कौतुक!

News Desk
मुंबई

मुंबईतील आठ पोलीस स्टेशनची धुरा महिला अधिकाऱ्यांच्या हाती

News Desk

मुंबई | मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलाच्या हाती देण्यात आली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई हे असे शहर आहे की, यात आठ पोलीस स्टेशनचा संपूर्ण कारभार महिलांकडे सोपवण्यात आला आहे. या महिलांनी अनेक अडचणीचा सामना करत त्यांच्या परिसरातील गुन्हा रोखण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी आठ स्टेशनची जबाबदारी या महिलांवर देण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड यांना सायन पोलीस स्टेशन, आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळचे सहार पोलीस स्टेशन लता शिरसत, गोरेगावातल्या वनराई पोलीस स्टेशनचा चार्ज ज्योत्स्ना रसम, रोहिणी काळे यांना पंतनगर पोलीस स्टेशन, विद्यालक्ष्मी हिरेमट यांना आरे पोलीस स्टेशन, तर बीकेसी पोलीस स्टेशनची जबाबदारी कल्पना गडेकर, एअरपोर्ट पोलीस स्टेशन अलका मांडवी तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांना कप परेड पोलीस स्टेशन या आठ महिलांच्या हाती पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे.

या महिला पोलीस निरीक्षकांची सोशल मीडीयावर खूप स्तुती होत तर आहे. याचबरोबर या आठ महिलांचा फोटो सध्या सोशल मीडीयावर अनेकांनी शेअर केला आहे. तसेच ट्विटरवर महिला सशक्तीकरणाचे नाव देत हा फोटो अपलोड करत मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

Related posts

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

swarit

आयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडी

News Desk

नालेसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष, धारावीतील शेटवाडी नाला गाळ कच-याने तुडुंब

News Desk