HW News Marathi
मुंबई

नालेसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष, धारावीतील शेटवाडी नाला गाळ कच-याने तुडुंब

मुंबई : धारावीतील शेटवाडी नाला गाळाने व कच-याने तुडुंब भरला आहे. या नाल्यातील पाणी गेल्या अनेक वर्षांपासून नाल्याच्या आसपास असलेल्या घरांमध्ये शिरते. त्यामुळे परिसरातील नागरीक प्रचंड त्रस्त आहेत. महापालिकेने सालाबादाप्रमाणे यंदाही हलगर्जीपणा केल्यामुळे विभागात अद्याप नालेसफाई झालेली नाही. त्यामुळे धारावीचा शेटवाडी नाला यंदाही पावसाळ्यात ओसंडून वाहण्याची शक्यता विभागातील नागरीक व्यक्त करत आहेत.

सध्या हा नाला भरल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विभागात डास प्रचंड प्रमाणात वाढले असून लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक नगरसेवक मात्र नाल्याची सफाई न करता रस्त्यांची डागडुजी आणि इतर बाबींना विषेश महत्व देत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी हा नाला उशीरा साफ केला जातो त्यामुळे पावसाळ्या दरम्यान सुरु झालेल्या नालेसफाईत हा नाला पुर्णपणे स्वच्छ होत नसल्याचे स्थानिक नागरीक सांगतात.

नाल्यात परिसरात असलेल्या कारखाण्यांचे सांडपाणी तसेच शौचालायाचे घाण देखील सोडली जाते. त्यामुळे या नाल्यावरुन जाताना लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या नाल्याजवळ रहाणा-या लोकांनी गेल्या अनेक वर्षात आपल्या घराच्या खिडक्या उघडलेल्या नाहीत. दरवर्षी नालेसफाई एप्रिल महिन्यात सुरु होते परंतु यंदा मे चा पहिला आठवड संपला तरीही अद्याप या नाल्याची स्वच्छता झाल्याचे दिसत नाही. पालिका अधिका-यांन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेटवाडी नाल्याकडे लक्ष देऊन स्वच्छता करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा | शरद पवार

News Desk

गोखले पूल दुर्घटनेनंतर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लुट

News Desk

भिडे समर्थकांचा आज सन्मान मोर्चा

News Desk