HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी केलं नव्या CBI संचालकांचं कौतुक ! महाविकासआघाडीसोबत झाले होते मतभेद

मुंबई । IPS अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज (२८ मे) महाराष्ट्राचे पोलिस संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी सीबीआयच्या संचालक पदाची सुत्रधार स्वीकारली आहेत. जयस्वाल यांनी ही सुत्रधार हाती घेतल्यानंतर राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक श्री. सुबोध कुमार जयस्वालजी यांनी सीबीआयच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्याची सीबीआय संचालक पदी झालेली निवड राज्याचा गौरव वाढवणारी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला होता. सुबोध जयस्वाल यांनी यापूर्वी महाराष्ट्र पोलिस महासंचालक म्हणून काम पाहिले होते. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच ऋषी कुमार शुक्ला यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत सीबीआयचे संचालक पद रिक्त होते. अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा अंतरिम प्रमुख म्हणून मुख्य तपास यंत्रणेचे काम पहात आहेत

महाविकास आघाडी सरकारसोबत झाला होता वाद

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस या तीन पक्षांच मिळून महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारसोबत सुबोधकुमार जयस्वाल यांचा वाद झाला होता. कारण होतं IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचं.

राज्यातील IPS अधिकार्यांच्या बदल्या आणि प्रमोशन या मु्द्यावरून सुबोध जयसवाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात मतभेद होते. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सरकारचं धोरण जयसवाल यांना पटलं नाही त्यामुळे सरकार आणि त्यांच्यातील दरी अधिक वाढत गेली होती.

दरम्याम, ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्याच अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी. बदली करताना कायद्याचं पालन केलं जाईल,” असं पत्र सुबोध जयसवाल यांनी ठाकरे सरकारला लिहीलं होतं. तर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “सुबोध जायसवाल यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला,” असा आरोपही प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धव ठाकरे इलेव्हन’ दिवाळीपर्यंत तुरुंगात, किरीट सोमय्यांचा इशारा!

News Desk

भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करणार का? या आमच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते म्हणून… गृहमंत्र्यांनी पुन्हा फडणवीसांना डिवचले

News Desk

पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही, चंद्रकांत पाटलांची स्पष्टोक्ती

News Desk