HW News Marathi
महाराष्ट्र

… म्हणून अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द!

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्याला जाणार होते. हेलिकॉप्टरनेच जाऊ अशी माहिती त्यांनी काल दिली होती, मात्र आज हवामान खराब असल्याने कोल्हापूरचा दौरा रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजित पवार आज(२६ जुलै) सकाळी ९ वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार होते. त्यानंतर सव्वा नऊन वाजता ते शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देणार होते. तिथून ते शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार होते. नंतर सव्वा दहा वाजता शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्याती पूरग्रस्त परिस्थितीचा आढाव घेणार होते.

उपमुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूर आला आणि लोकांचं जीवन विस्कळीत झालं. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून, पुरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील भागांची पाहणी करणार आहेत.

अजित पवारांच्या दौऱ्यात बदल

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूर आला आणि लोकांचं जीवन विस्कळीत झालं. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून, पुरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज (२६ जुलै) दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील भागांची पाहणी करणार होते. मात्र, अजित पवारांच्या दौऱ्यात काहीसा बदल झाला आहे. अजित पवार कोल्हापूरऐवजी सांगलीला रवाना झाले आहेत.

सातारा जिल्ह्यात दोन गावांमध्ये दरड कोसळून मोठी जीवित हानी झाली आहे. दोन्ही गावांमध्ये मदत व बचावकार्य सध्या चालू सुरू आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून, आंबेघर आणि मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना घडल्या होत्या. या भागांना मुख्यमंत्री आज भेट देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित सतिश चव्हाण यांच्या मागणीला मिळणार यश!

News Desk

परळीत मुंडे बहीण भाऊ एकच!; काँग्रेसच्या शहर अध्यक्षांचा गंभीर आरोप

News Desk

राज्यातील सरकार सर्व आघाडयांवर नापास झाले आहे

News Desk