HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात पावसामुळे मृत व्यक्तींचा आकडा १४५ वर

रत्नागिरी। राज्यात ३ दिवस जोरदार पावसाने थैमान घातलं होतं. ठिकठिकाणी नद्या वाहू लागल्या आणि दर्दी कोसळल्या. पुरामुळे गेल्या तीन ते चार दिवसांत १४५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जखमी झाले. दरड दुर्घटना आणि पुरात बेपत्ता असलेल्या सुमारे शंभराहून अधिक नागरिकांचा शोध सुरू आहे, तर एक लाख ३५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

मृत व्यक्तींमध्ये वाढ

राज्यात ठिकठिकाणी दर्दी कोसळून अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. याच मृत व्यक्तींचा आकडा वाढताना दिसत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमधील दरड दुर्घटनांतील मृतांचा आकडा शनिवारी ७४ वर पोहोचला. दरडी कोसळल्याने रायगडमध्ये ५३, रत्नागिरी जिल्ह्यात तीन आणि सातारा जिल्ह्यात १८ जणांचा बळी गेला. रायगड जिल्ह्यात ४३, रत्नागिरी जिल्ह्यात १७ आणि साताऱ्यातील २२ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या १२ दुर्घटना घडल्या. त्यांतील १८ मृतदेह शनिवारी ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. पाटण, महाबळेश्वर, जावली आणि वाई येथे शुक्रवारी रात्री १२ ठिकाणी डोंगरकडे कोसळून अनेक घरे गाडली गेली. त्यांतील २२ नागरिक बेपत्ता आहेत. या दुर्घटनांमध्ये तीन हजारांहून अधिक पाळीव जनावरांचा मृत्यू झाला.

अनेक नागरिक सुरक्षित

पुरात ज्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे त्यानां सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात नदीकाठच्या गावातील ७८ हजार, कोल्हापूर जिल्ह्यात ४१ हजार, साताऱ्यात ७ हजार, रत्नागिरीत १२००, रायगडमध्ये १०००, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२७१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या ३४ तुकड्या, राज्य आपत्ती निवारण पथकाच्या सहा, तटरक्षक दलाच्या तीन, नौदल, हवाईदल, लष्कराच्या १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग यावरून राजकारण करू नये !

News Desk

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार

Aprna