HW News Marathi
देश / विदेश

कोरोनाला हरवलं, आता निवडणुकाही जिंकू ! योगी आदित्यनाथांना निवडणुकांचे वेध

नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोना काळात सर्वात भयावह स्थिती पाहायला मिळाली ती उत्तर प्रदेश राज्यात. जगभरात ते चित्र उमटले. मात्र, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. “आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू”, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, कोरोना काळात जे प्रचंड अपयश योगी सरकारला आले आहे ते पाहता ही निवडणूक योगी सरकार आणि भाजपसाठी मोठी कठीण ठरू शकते. मात्र, या परिस्थितीतही विधानसभा निवडणुकांसाठी योगी आदित्यनाथ यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे.

जागरण वृत्त समुहाच्या संपादकीय मंडळाशी बोलताना येत्या विधानसभा निवडणुकांसंदर्भातही योगी आदित्यनाथ यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.कोरोनाविरुद्धच्या लढाईत उत्तर प्रदेश सरकारने यशस्वी कामगिरी केल्याचे म्हणत स्वतः पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. आता मोदींच्या याच कौतुकामुळे योगी आदित्यनाथ यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. उत्तर प्रदेशमधील कोरोनास्थिती आटोक्यात आणल्याने योगी आदित्यनाथ समाधानी असल्याचे म्हटले जात आहे.

जगभरात ज्याचे पडसाद उमटले आणि देश हादरला त्या गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांबद्दलच्या घटनेवरही योगी आदित्यनाथ यांचे स्पष्टीकरण आता आले आहे. “सध्या अनेकजण अफवा पसरविण्यात आणि वातावरण दुषित करण्याचं काम करत आहेत”, असे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नामकरण

News Desk

शोपियानमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

राबडी देवींच्या घरी CBI चा छापा; काय आहे नेमके प्रकरण

Aprna