HW News Marathi
महाराष्ट्र

चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करण्याची राऊतांची मागणी, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला दिले उत्तर 

मुंबई | गेले अनेक दिवस शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यावरुन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना फार गांभीर्याने घेत असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच या विधानाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे”.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत खैरे-अब्दुल्ल सत्तार यांच्यातील वाद संपला, सर्व गैरसमज दूर झालेत !

News Desk

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी दर्गा येथे भव्य यात्रा महोत्सव

News Desk

पूरग्रस्तांना मदत जाहीर, विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती

News Desk