HW News Marathi
महाराष्ट्र

लोकशाही पूर्णपणे नष्ट केली…

मुंबई | २०१४च्या विधानसभा निवडणूकीनंतर भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी शिवसेनेने आपला पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत युती बनविण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत विरोधी विचारसरणी असतानाही शिवसेनेशी आघाडी करावी, असे काँग्रेसला का वाटले? असे विचारता, चव्हाण यांनी २०१४ मधील राजकीय स्थितीचा दाखला दिला. भाजपाला रोखण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याकडे संपर्क साधला. मात्र, मी तातडीने हा प्रस्ताव फेटाळला. राजकारणात जय-पराजय होत असतातच, आम्ही निवडणुक हरल्याने विरोधात बसणार हे त्यावेळी स्पष्ट केले होते. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

२०१९च्या नोव्हेंबर महिन्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी ठाकरे सरकारच्या अध्यक्षतेखाली युतीची स्थापन करत महाविकास आघाडीचे नवे सरकार उभे केले.कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या युतीबाबत विचारले असता, अशीच स्थिती २०१४ सालीही निर्माण झाली होती जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीने कॉग्रेससोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्या मी प्रस्तावाला नकार दिला होता. कारण जिंकणे किंवा हारणे हे तर राजकारणात होतच असते आम्हीही या आधी भुतकाळात हार पाहिली आणि विरोधी पक्षात बसून आम्हीही लढलो आहोत, अशा शब्दात त्यांनी टोलाही लगावला.

२०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारत सत्ता हाती घेतली आणि त्याला शिवसेनेनेही हातमिळवणी केली होती. फडणवीसांच्या सरकारने विरोधकांचा खात्मा करत भ्रष्टाचाराचे प्रमाणही वाढले होते असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.आताच्या सरकारवर निशाणा साधत यावेळेस लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला तसेच, पक्षांचे आमदार पक्ष सोडून जात होते तसेच मोठ्या पदांचे आमिष दाखवून आमदारांना आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्नही करण्यात आला असा स्पष्ट दावाही त्यांनी यावेळी केला.

त्यामुळे सद्यस्थितीचा अंदाज घेत आम्ही पर्यायी सरकारबद्दल विचार केला आणि भाजप-सेनेच्या भांडणानंतर या पर्यायी सरकारच्या स्थापनेबद्दल विचार केला असल्याचंही चव्हाण यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार

Aprna

शिवसेना मोठी होण्यात माझा मोठा वाटा आहे!

News Desk

चंद्रकांत पाटील को गुस्सा क्यू आता है? हसन मुश्रीफ म्हणतात…

News Desk