HW News Marathi
महाराष्ट्र

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग! – उपमुख्यमंत्री

मुंबई । राज्यात सायबर सुरक्षा (Cyber Security) अतिशय महत्त्वाची असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धुळे शहरात मोबाईल वरून शहरातील मुलींचे छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.

छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढण्याविषयी तसेच इतर विविध गुन्ह्यांविषयी सायबर कायदे जुने असून माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्याची सूचना केंद्राला पाठविण्यात येणार आहे.राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य रईस शेख, प्रा.वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुका होतील त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल !

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादी थकलेत, भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येणार !

News Desk

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

Aprna