HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र आणि देशासाठी पुनावालांनी महत्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती!

मुंबई | राज्यातील कोरोना लसीच्या तुटवड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१ मे) भाष्य केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विधान भवन येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत राज्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली. राज्याला अधिक लस मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली.

या चर्चेदरम्यान निश्चित लसीचा अधिकाधिक पुरवठा केला जाईल असे त्यावेळी सांगितले गेले. मात्र नंतर एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र आणि देशासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती.

लसीचा प्लांट आपल्या पुण्यात असल्याने, आपल्या इथे अधिक लस कशी मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज(दि.१) पुण्यात मांडली. तसेच, सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतला आहे. तरी देखील राज्य सरकार भारत बायोटेककडे अधिक लस कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या येथील नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण कसे होईल यावर सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, सध्या देशात आणि राज्यात कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे करोना बधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत १५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Aprna

अखेर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेले ‘हे’ वचनपूर्ण केले

News Desk

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मागणी

News Desk