HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेले ‘हे’ वचनपूर्ण केले

मुंबई | “शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन,”असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.” यासाठी हे वचनपूर्ण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी २८ सप्टेंबरला मुंबईच्या रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा म्हटले होते. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेले हे वचन आज (२२ नोव्हेंबर) अखेर पूर्ण केले आहे. ठाकरे घरण्यातील उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री होणार आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले होते. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, भाजपने अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला अमान्य केला. यामुळे भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात सत्तासंघर्ष निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजपमध्ये अजी यानंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. शिवसेना सुरुवातीपासून मुख्यमंत्री पदासाठी आग्रही राहिली आहे. अखेर उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेमके कोणते वचन दिले

“शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन,” असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासाठी मी बाळासाहेबांना दिलेले वचनपूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा मेळाव्यात सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः शिवसेनाप्रमुखांना हातात हात घेऊन वचन दिले आहे की, एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत मला सत्ता पाहिजे आहे. त्यामुळे सगळ्या २८८ जागांवरच्या इच्छुकांना मी बोलावले. गेल्या पाच वर्षात आपण जे काही काम केले आहे, त्याबद्दल धन्यवाद द्यायला बोलावले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मुख्यमंत्र्यांचा आजी मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबद्दल दिला ‘हा’ सल्ला

News Desk

HW Exclusive: मी राजकीय षडयंत्राचा बळी | एकनाथ खडसे

News Desk

‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा

swarit