HW News Marathi
महाराष्ट्र

चक्रीवादळामुळे झालेली नुकसाभरपाई द्यावी – फडणवीस

मुंबई | काल (३ जून) निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्रातील अनेक भागात हैदोस घातला होता. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात विशेषत: कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, मासेमार, फलोत्पादक, छोटे दुकानदार, मूर्तिकार यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने घरांचे आणि घरातील सामुग्रींचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने सर्वत्र तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. पुणे, नाशिक, मालेगाव या भागात सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल खरेदी होत नसल्याने आधीच शेतकरी त्रस्त आहे. आता प्रत्यक्ष हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई द्यावी, ही राज्य सरकारला ट्विटरद्वारे विनंती केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…!

News Desk

१० लाख मराठा उतरणार मुंबईच्या रस्त्यांवर!

News Desk

आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता आहे, राष्ट्रवादीला भाजपकडून उत्तर 

News Desk