HW News Marathi
महाराष्ट्र

“दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अन्यथा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन करू”-देवेंद्र फडणवीस

तेर | अतिवृष्टीमुळे उस्मानाबादसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही, असा इशारा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. काही वर्षांपूर्वी विमा कंपन्यांचे कार्यालय फोडणारे, सत्ता मिळताच गप्प का? असा सवालही फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता उपस्थित केला. उस्मानाबाद तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त दाऊतपूर, इर्ला, चिखली, करजखेडा,वाणेवाडी, तेर येथील गावांना भेटी देवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

जवळपास एका जिल्ह्याला ८०० कोटी आपण देण्याचा प्रयत्न केलेला होता.

फडणवीस म्हणाले की, खरीप २०२० पिक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, त्यात ही अतिवृष्टी… यामुळे शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. जवळपास २५ लाख हेक्टर जमीन बाधित झालेली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लवकरात-लवकर मदत जाहीर करणे महत्त्वाचे आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना अशा निसर्गनिर्मित बिकट परिस्थितीत जवळपास एका जिल्ह्याला ८०० कोटी आपण देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आजच्या स्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला ८०० कोटी मिळाले नाही.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कुजलेले पीक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी आमच्याकडे दिले आहे. त्यांचा संदेश आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्कीच पोहोचवू. आमची मुख्य मागणी हीच राहील की दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत. अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला‘जय महाराष्ट्र’ केला! विखे पाटील

News Desk

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर ? पृथ्वीराज चव्हाण

News Desk

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

Aprna