HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय वर्तृळातील महत्वाच्या असणाऱ्या पहाटेच्या त्या शपथविधीला आज १ वर्ष पुर्ण

मुंबई | अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. राजकीय वर्तृळातील या मोठ्या भूकंपाला आज (२३ नोव्हेंबर) १ वर्ष झाले. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरु शकली नाही आणि त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली होती.

त्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यालाही आता १ वर्ष पुर्ण होण्यास आले आहे. भाजपला बहुमतासाठी ४० आमदारांची गरज होती. भाजपचे १०५, अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष असे १५ आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 38 आमदार असा बहुमताचा आकडा पार करता येईल, अशी फडणवीसांना आशा होती. मात्र ती केवळ आशाच राहिली. कारण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे २३ नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. त्यांना ८० तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

शपथविधीनंतर फडणवीस काय म्हणाले होते?

23 नोव्हेंबर २०१९ ला पहाटे शपथविधी पार पडल्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटी व फसवणूकीचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Aprna

शरद पवारांचं राजकीय गणित असू शकतं, खडसेंच्या प्रवेशावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मागणी

News Desk