HW News Marathi
महाराष्ट्र

राऊत यांनी कोविड पेशंटचे काय होणार? असा प्रश्न विचारला असता तर आनंद झाला असता – फडणवीस

भिवंडी | सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. मात्र, राजकारण देखील तापत चालले आहे. आणि आघाडीचं सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेतच. अशातच आज (५ जुलै) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी, उल्हानगर येथे पाहणी केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोकमधून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे काय होणार असा सवाल उपस्थित केला आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीला होणाऱ्या दिरंगाईवरुन राऊत यांनी अग्रलेखातून आपल्या रोखठोक या सदरात राज्यपालांना लक्ष्य केले आहे. तसेच ही परिस्थिती राजकारणातील नवी आणीबाणी असल्याचा आरोप देखील केला आहे.

यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, मला असं वाटतं सध्या संजय राऊत यांनी १२ आमदारांची काळजी करू नये तर महाराष्ट्राची काळजी करावी. तसेच, कोविड पेशंटची काळजी करावी. ज्यांना उपचार मिळत नाही अशा कोविड पेशंटचे काय होणार असा प्रश्न जर त्यांनी विचारला असता तर मला जास्त आनंद झाला असता, असे त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे!

News Desk

“लहान माझी बाहुली तिची मोठी सावली”, पंकजा मुंडेंचे बहिणीच्या वाढदिवशी खास ट्विट

News Desk

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना दिलासा….

News Desk