HW News Marathi
महाराष्ट्र

महिलांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस माफी मागा, आदित्य ठाकरेंची मागणी …

मुंंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये झालेल्या मोर्चामध्ये शिवसेनेला लक्ष्य केले होते. शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील,पण भाजपने नाही असे विधान त्यांनी केले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना सुनावत माफीची मागणी केली आहे,

ट्विटरवर ट्विट करत  मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्या “बांगड्या” या टिप्पणीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे. पर्यटनमंत्री  आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सर्वांत  बलवान – महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहे,बांगड्या हे कमकुवत पणाचं नाही तर मजबुतीचं प्रतिक आहे”,त्यामुळे अशा पद्धतीचे विधान बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काही दिवसांपुर्वी एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते,त्या वक्तव्यावरून फडणवीस यांनी शिवसेनेला टार्गेट केले होते.मात्र आता आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांकडे माफीची मागणी केली आहे.एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत असे वक्तव्य केले होते,मात्र आदित्य ठाकरे सध्या आपली एक वेगळी छबी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार, बाळासाहेब थोरात

News Desk

अंबानींच्या घराबाहेरील ‘तो’ प्रसंग NIAने केला रिक्रिएट

News Desk

सरकारच्या पोलिस दलातील फेरबदलांमुळे दलात नाराजी, मुख्यमंत्र्यांना मेसेज पाठवून अधिकारी सुट्टीवर?

News Desk