HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारच्या पोलिस दलातील फेरबदलांमुळे दलात नाराजी, मुख्यमंत्र्यांना मेसेज पाठवून अधिकारी सुट्टीवर?

मुंबई | राज्यात सध्या अंबानी स्फोटक प्रकरण आणि सचिन वाझे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या प्रकरणात सचिन वाझेंच्या अंबानी स्फोटक प्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची वेळ ओढावलेल्या ठाकरे सरकारसमोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे. या बदल्यामुळे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी नाराज झाले आहेत. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) माजी प्रमुख संजय पांडे यांचा समावेश आहे.

परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी आज (१८ मार्च) या विभागाचा पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, ते आज होमगार्डच्या मुख्यालयात जाणार नाहीत. ते मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर होमगार्डचे माजी डीजी संजय पांडेही प्रचंड नाराज आहेत. संजय पांडे हे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचा कारभार देण्यात आला होता. मात्र, या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरून नाराजी व्यक्त करणार संदेशही पाठवला. त्यानंतर संजय पांडेही तातडीच्या सुट्टीवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

News Desk

अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता तर तिला न्याय मिळाला असता

News Desk

हायकोर्टात बुधवारी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी

News Desk