HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस दलाचं खच्चीकरण, गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या, फडणवीसांची मागणी  

मुंबई | सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारा एक मोठा गौप्यस्फोट माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांच्या कारनाम्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

यावरुन आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारवर गंभीर टीका केली जात आहे.मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही यावेळी भाजपकडून केली जात आहे. भाजपकडून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी मृख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक, डीजी रँकच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सेंट्रल एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी

राज्याचे गृहमंत्रीच पोलिसांना वसूली करायला सांगणं ही गंभीरबाब आहे. पोलीस दलाचं खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. ही घटना म्हणजे कळस आहे. इतक्या वाईट प्रकारे ही परिस्थित समोर आल्याने देशमुख पदावर राहू शकत नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं सांगतानाच या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे. सेंट्रल एजन्सीकडून ही चौकशी व्हावी. सेंट्रल एजन्सी नको असेल तर कोर्टाच्या अंतर्गत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच कारवाई करायला हवी होती

देशमुखांवर करण्यात आलेला आरोप हा राजकीय नाही. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने हा आरोप केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात सरकारने नैतिक भूमिका घेतली पाहिजे. जे बोलतात ते कृतीत उतरवलं पाहिजे, असं सांगतानाच परमबीर सिंग यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या नजरेला आणून दिले असतील तर त्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे होती. तेव्हा कदाचित सरकारला धोका असल्याचं लक्षात आल्याने कारवाई केली नसावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासंबंधी दिल्लीच्या वकिलांशी अशोक चव्हाणांनी केली चर्चा

News Desk

ज्ञानवापी मशिदी प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी 3 वाजता होणार – सर्वोच्च न्यायालय

Aprna

‘केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांसोबत चर्चा’, शरद पवार!

News Desk