HW News Marathi
देश / विदेश

बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी !, अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई । राज्यातील ठाकरे सरकारची पुरती कोंडी झाली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अत्यंत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यात थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या आरोपांमुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर, विरोधी पक्ष भाजपनेही टीकेची संधी साधली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी आज (२० मार्च) आपल्या ट्विटमध्ये सवाल सूचक उपस्थित करत म्हटले आहे की, “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” दरम्यान काल (१९ मार्च) देखील अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारला डिवचताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “कोण कोणास म्हणाले – *व्यवहार माझे,* *जबाबदार वाझे!* सांगा पाहू …….” दरम्यान, निश्चितच ठाकरे सरकारसाठी एक अत्यंत आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे.

परमबीरर सिंह यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे तर आणखीच गंभीर स्थिती आहे. या सगळयाच्या पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांचे गृहमंत्री जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याविषयी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे. गृहखाते, पोलीस दल आणि सरकारची सातत्याने होत असलेल्या या मानहानीचे काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणूका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?”,जयंत पाटलांचा संतप्त सवाल

News Desk

एडीआर रिपोर्टनुसार भाजपच्या २२४ पैकी ८३ उमेदवारांवर गुन्हे दाखल

swarit

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, चर्चांना उधाण

News Desk