HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर दौरा, पूरग्रस्त भागाची केली पाहणी

कोल्हापूर | राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा नेत्यांकडून घेतला जात आहे. कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागाचा पाहणी दौरा गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तर करत आहेतच. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ही दौरे करत आहेत. काल आणि आज देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (३० जुलै) फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांच्या सोबतीने कोल्हापूर दौरा केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आज कोल्हापूरात दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री कालच कोल्हापूरला जाणार होते. मात्र हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

दौरा मी येत्या 3 दिवसांत करणारचं

आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे पवार साहेबांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या 3 दिवसांत करणारचं आहे’, असं फडणवीस म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या भूकंपा वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे अनावश्यक दौरे टाळावे. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली ते दहा दिवसानंतर आले. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो, असं शरद पवार म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

News Desk

राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले आणि गेले, वरवरच्या पाहणी दौऱ्यानं शेतकरी संतप्त!

News Desk

भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही !

News Desk