HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही !

मुंबई | भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही, असा सुचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर दिला. तसेच उद्धव ठाकरेंनी भाजपला पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या वेळी ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरला होता, यांची आठवण करून दिली. विधानसभेच्या वेळी चंद्रकांतदादांनी काही अडचणी सांगितल्या होत्या, पण भाजपच्या सगळ्या अडचणी समजून घेऊ शकत नाही. पण मलाही पक्ष चालवायचा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला एक प्रकारचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे काल (२४ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप शिवसेना युतीला गेल्यावेळच्या तुलनेत कमी जागांवर यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. युतीचे सरकार स्थापन होऊ शकेल एवढ्या जागा जनतेने दिल्या आहेत. जनतेने जागरूकतेने मतदान करत सर्वच पक्षांना जमिनीवर पाय ठेवण्याचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले. सर्वच पक्षाचे डोळे उघडणारा हा जनादेश आहे. जनतेने ज्या अपेक्षेनं आम्हाला आशीर्वाद दिलाय, त्या अपेक्षेवर काम करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… म्हणून पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं”, उध्दव ठाकरेंकडून राज्यपालांना प्रत्यूत्तर!

News Desk

काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू, भाजपाचा टोला

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज काय ?

News Desk