HW News Marathi
महाराष्ट्र

हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये, राऊतांचा विरोधकांना सल्ला  

मुंबई | सरकारने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं आहे, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं कोणी फासलं? असा सवाल करतानाच विरोधी पक्षाने पोलिसांच्या तोंडाला काळं फासू नये. देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष सत्तेत होते. पोलिसांचं काम कसं चालतं हे त्यांना माहीत आहे. त्यांनी अशी भाषा करू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला. तसेच मुनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक यांचा असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर यांचा असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच हवा. त्यासाठी राज्याचे पोलीस आणि यंत्रणा सक्षम आहेत. विरोधी पक्षाने त्यावर शंका घेणं म्हणजे पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्यासारखं आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील आणि त्याची दखल घेतली जात नसेल तर त्यांनी वेगवेळ्या प्लॅटफॉर्मवर आवाज उठवला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

एनआयएला तपास देण्यामागे काळंबेरं

हिरेन प्रकरणाचा एनआयएला तपास करू द्या. एटीएसचा तपास सुरू आहे. निष्कर्ष आला नाही. घाईघाईत एनआयएला तपास देणं यात मला तरी काही तरी काळंबेरं असल्याचं दिसून येतं, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण महाविकासआघाडी सरकारला भोवणार का? पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल!

News Desk

शेतकर्‍यांना खलीस्थान वादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले?- राजू शेट्टी

News Desk

किरीट सोमय्यांचे मुंबई पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, उद्या राज्यपालांना भेटणार

Aprna