HW News Marathi
महाराष्ट्र

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!; ‘म्हाडा’च्या परीक्षा रद्द झाल्याने फडणवीसांचा संताप

मुंबई । आयत्यावेळी रद्द झालेल्या ‘म्हाडा’च्या परिक्षानंतर आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे म्हाडा पदभरतीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओमार्फत दिली आणि हजारो परिक्षार्थ्यांना विनाकारण मनस्ताप झाला. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित आहे की नाही?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. फडणवीसांनी ट्विट करत हा सवाल केला आहे.

देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आधी आरोग्य भरती परीक्षेचा घोळ, पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. हा भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस” असल्याचंही फडणवीस म्हणाले.

“किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका. दोषींवर कठोर कारवाई कराच. पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?”, असंही ट्विट करत यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलं असून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, दरेकरांचा गृहमंत्र्यांना सल्ला

News Desk

मात्र आज पवारांनी त्याच्या पुढचा पर्याय नितिन गडकरींना सांगितला!

News Desk

तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकिर्दी एवढंही नाही, हर्षवर्धन पाटलांची लेक तांबेंवर गरजली 

News Desk