HW News Marathi
महाराष्ट्र

कोकण मुंबईपासून काही अंतरावर आहे, तरीही मदतीसाठी वाट पाहावी लागते – फडणवीस

मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांत नुकसान झाले. कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहचू शकलेली नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज (३ जुलै) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोकणवासियांना सध्या लहानसहान गोष्टींसाठीही एक-एक महिना वाट पाहावी लागत आहे. कोकण हा मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा कोकणाची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी कोकणाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान होते. या जिल्ह्यांतील अनेकांची घरे वादळामुळे उद्ध्वस्त झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टीं

News Desk

‘संयम सोडू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यापाऱ्यांना आवाहन!

News Desk

एलबीएस मार्गावरील उघडे मॅनहोल मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता !

News Desk