HW News Marathi
महाराष्ट्र

प्रताप सरनाईकांवर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ प्रतिक्रिया

सोलापूर | महाविकास आघाडी सरकारला ईडीने मोठा धक्का दिला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे. सध्या प्रताप सरनाईक देशाबाहेर आहेत. दरम्यान, सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. तर सरनाईकांचे दुसरे पुत्र पुर्वेश सरनाईक यांच्या घराकडे ईडीचे दुसरे पथक रवाना झाले आहे. यावर राजकीय वर्तृळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपकडून या कारवाईचे समर्थन केले जात आहे.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीच्या करण्यात आलेल्या कारवाईवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी पथक दाखल झालं असून शोधमोहिम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांवरील कारवाईसंबंधी विचारण्यता आलं असता ते म्हणाले की, “ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल”..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९ वर, लोकल बंद करणे ‘हा’ शेवटचा पर्याय !

swarit

हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीने कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा

swarit

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाला गती द्यावी! – मुख्यमंत्री

Aprna