HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९ वर, लोकल बंद करणे ‘हा’ शेवटचा पर्याय !

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४९ वर गेला आहे. तर गेल्या १२ तासात राज्यात ७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह अढळली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्र सद्या फेज २ मध्ये आहे, राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी गर्दी कमी करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

लोकल ट्रेनमधून संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे लोकांनी कार्यालयास येणे टाळावे, लोकांनी घराबाहेर पडणे टाळा, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत. राज्य सरकारने राज्य सरकारने १२ देशाची फ्लाईट सेवा पूर्णपणे बंद केल्या आहेत. तसेच १२ देशांव्यतिरिक्त इतर नागरिकांचे विलीनीकरण नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहे.

योग्य वेळी योग निर्णय घेतला जाईल, लोकल ट्रेन बंद करणे हा शेवटचा पर्याय असल्याचे संकेत दिले असून राज्यात २ कोरोना रुग्ण व्हेंटिलेटवर आहे. तर इतर कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. उद्या (२० मार्च) पंतप्रधान मोदी सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करावी लागेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकार फसवणूक करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Aprna

2022 पर्यंत भारताच्या सीमेवरील कुंपणाचे काम पूर्ण होणार; अमित शहांनी दिली माहिती

News Desk

मराठा आणि ओबीसी समाजात सरकारला भांडणं लावायची आहेत, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

News Desk