HW News Marathi
महाराष्ट्र

रेमडेसिवीरच्या साठ्यावरुन फार्मा अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि फडणवीस भडकले !

मुंबई | महाराष्ट्रात रेमडेसिवीरवरून सध्या मोठं राजकारण सुरू आहे.महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप मंत्र्यांनी केला.यादरम्यान रेमडेसिवीरचा साठा एका फार्मा कंपनीने केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर विले पार्ले पोलिसांनी ब्रुक फार्मा या कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या अशा कारवाईची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड हे थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावेळेस त्यांनी फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात का घेतलं यावरून पोलिसांची खरडपट्टी काढली.

या सगळ्या प्रकारादरम्यान फडणवीसांनी पोलिस आयुक्तांना फोन केला. यानंतर अखेर ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आलं. यावेळेस फडणवीसांनी पोलिसांवर आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि कारवाई केली जाते

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

“महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

“एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलिस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. पोलिस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार! – मुख्यमंत्री

News Desk

फडणवीस सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्त्वाच्या तरतुदी

swarit

जनाशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण!

News Desk