HW News Marathi
महाराष्ट्र

जनाशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण!

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. जाणयात्रेवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्र्यांची जनयात्रा सुरु असल्याने त्यावर आता विरोधी पक्षाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात… ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

वर्क फ्रॉम होमच करायचं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसन काम करतात म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केल्या आहेत. एका सर्व्हेत मध्ये सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्रयांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव आहे, तर भाजच्या एकही मुख्यमंत्र्यांच्या नावाचा समावेश नाही आहे. यावर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री घरी बसूनच असल्याची त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. घरी बसून टॉप पाचमध्ये येता येतं का? ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, स्टॅलिन हे टॉप फाईव्हमध्ये आले ते घरी बसून आले का? याचं उत्तर विरोधकांनी दिलं पाहिजे, असं सांगतानाच त्याकाळात प्रत्येकाना वर्क फ्रॉम होमच करायचं होतं. तुम्ही उकीरडे फुंकत फिरलात कारण नसताना, त्याला आम्ही काय करणार, असा हल्लाही त्यांनी चढवला आहे.

फटाके फोडू

उद्धव ठाकरे प्रत्येक सर्व्हेत टॉप टेन आणि टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. आता ते टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. लवकरच ते टॉप वन होतील. आमचे राजकीय विरोधक काहीही म्हणून द्या. ते म्हणतील हा कसला पोल? असा पोल असतो का? ते काहीही म्हणून द्या. जेव्हा तुमच्याबाबतीत पोल येत होते, तेव्हा तुम्ही त्याचे ढोल आणि झांजा वाजवत होता. आता आम्हीही फटाके फोडू. आमचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आणि गर्व वाटावं असं नेतृत्व आहे. त्यांचं काम उत्तम चालू आहे. विकासाचं आणि कोरोना नियंत्रणाचं काम चांगलं चालू आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २४ तासांत होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून कुणाची लागणार वर्णी?

Ruchita Chowdhary

“…म्हणजे मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?” फडणवीसांचा सवाल

News Desk

धनगर समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार कटिबद्ध आहे !

News Desk