HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजपा राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही”, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई | केंद्रीय मंत्री मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयी बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, ” “राणेसाहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही”. देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

राणेसाहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण….

देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाकारले आहे. ते पुढे बोलताना बोले, ““राणेसाहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेसाहेबांच्या मागे ठाम उभे आहोत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“बोलण्याच्या भरात कदाचित राणे साहेब ते बोलले असतील, ते वापरायचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. तथापि मुख्यमंत्री हे एक महत्त्वाचे पद आहे, त्या पदाबद्दल बोलत असतांना संयम बाळगणे आवश्यक आहे, असं माझं मत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्री विसरतात, यामुळे कोणच्या मनात संताप होऊ शकतो, तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो”, देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

वासरू मारलं तर आम्ही गाय मारू हे योग्य नाही

“वासरू मारलं तर आम्ही गाय मारू हे योग्य नाही, भाजप राणे यांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल मात्र राणे यांच्या पाठीशी उभा राहील, असेल. सर्जील उस्मानी राज्यात येतो आणि भारत मातेबद्दल बोलतो मात्र कारवाई होत नाही. आता इथे पोलीस राणेंवर कारवाईसाठी निघाले आहेत. पोलिसांचा गैरवापर चाललेला आहे. सरकारने बस म्हंटल्यावर काही लोकं लोटांगण घालत आहे, केवळ काही लोकांना खुश करण्याकरता हे करत असतील तर ते महाराष्ट्रसाठी योग्य नाही. पोलीसजीवी सरकार झालेलं आहे. माझा सल्ला आहे पोलिसांनी कायद्याने काम करावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

कायद्याच्या भाषेत हा गुन्हा दखलपात्र नाही

देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “कायद्याच्या भाषेत हा गुन्हा दखलपात्र नाही. पण त्याला जबरदस्तीनं दखलपात्र गुन्हा करायचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांचा गैरवापर होतोय. महाराष्ट्र पोलिसांचं काम मला माहित आहे. ते निष्पक्ष आहेत.. पण आता त्या पोलिसदलांचा ऱ्हास होत आहे. बस म्हटल्यावर काही जण लोटांगण घालतात. सरकारला खूश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागली तर महाराष्ट्राची प्रतिमा डागाळेल. आयुक्त स्वताला छत्रपती समजतात का?, जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना अटक करा, ही काय भाषा आहे का?, ते काय स्वताला छत्रपती समजतात का?”असा आक्रमक पवित्रा देखील देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले – सत्यजीत तांबे

News Desk

कमला मिलमधील पबच्या आगीत होरपळून मुत्यू झालेल्या १४ मुंबईकरांना न्याय द्या, शेलारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

News Desk

१२वीच्या परीक्षांबाबत निर्णय नाहीच! मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेवर वर्षा गायकवाड म्हणतात…

News Desk