HW News Marathi
महाराष्ट्र

१२वीच्या परीक्षांबाबत निर्णय नाहीच! मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेवर वर्षा गायकवाड म्हणतात…

मुंबई | केंद्र सरकारने CBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर गुजरात, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांनी देखील आपापल्या राज्यत १२वीच्या परीक्षा रद्द केल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार? याची चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. आजच्या (३ जून) मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यासंदर्भात निर्णय होईल अशी शक्यता होती.मात्र, आजही निर्णय न झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मंत्रिमडळात आज बारावीच्या परीक्षांबाबत झालेल्या चर्चेची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण केलं आहे.

आता निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे! – वर्षा गायकवाड

“शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं आहे. बैठकीनंतर त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

“विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची भूमिका आहे !”

“कोरोनाच्या परिस्थितीमध्ये १२वीची परीक्षा २३ एप्रिलला होणार होती. ती आम्ही मे अखेरपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर देखील करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत ती पुन्हा पुढे ढकलली. केंद्रानं मंगळवारी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमध्ये सूसूत्रता असायला हवी असं म्हटलं होतं. या सर्व बाबींविषयी मंत्रिमंडळाला आज अवगत करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची भूमिका राहिली आहे. आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल”, असं देखील शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव मान्य होणार का? नेमका निर्णय कधी जाहीर केला जाणार? याविषयी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये देखील संभ्रम आणि चिंता व्यक्त होऊ लागली आहे. काय निर्णय घेतला जाणार? परीक्षा रद्द होणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा! – ॲड.यशाेमती ठाकूर

Aprna

एकनाथ खडसेंना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावली 

News Desk

राज्यात आज 4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk