HW News Marathi
महाराष्ट्र

फलक लावून दादा-भाऊ होणारे खूप झाले!  

पुणे | राजकीय व्यक्तीचे आयुष्य पाच वर्षांचे असल्याने नेत्याला पाच वर्षांनी जनतेसमोर जावे लागते. आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रथम वर्ष कार्यअहवालाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.

आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक असतील तर आम्ही कोणीच मालकाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी या सेवकाने मालक असलेल्या जनतेप्रति उत्तरदायी असलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.समाजाने कसोटीच्या क्षणांसाठी नेत्याला विश्वासाने पुढारलेपण दिलेले असते. नेत्याला आत्मविश्वास नसेल तर समाजाने कोणाकडे पाहायचे? फलक लावून दादा-भाऊ होणारे खूप झाले आहेत. पण अशाने नेता होता येत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यातील नागरिकांना रमजान ईदच्या शुभेच्छा

Aprna

विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘मांजरचेष्टा’ करतो!; संजय राऊतांचा प्रहार

News Desk

सरकार तर्फे गिरीश महाजन यांची रात्री शेतकरी मोर्चाला भेट

News Desk