HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या आकडेवारीचे व्यवस्थापन करण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टीकोनातून उपाययोजनांवर भर द्यावा – फडणवीस

मुंबई | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना सरकारने केवळ आकडेवारीचे व्यवस्थापन करण्यापेक्षा ठोस वैज्ञानिक दृष्टीकोनातून उपाययोजनांवर भर द्यावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारला दिला आहे. राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचा दावा सध्या महाविकासआघाडी सरकारकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सरकारच्या दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

“६ ऑगस्टला राज्यात एकूण ७८,७११ कोरोना चाचण्या झाल्याचे सरकारी आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, यापैकी ५०,४२१ म्हणजे ६४ टक्के चाचण्या या अँटीजेन स्वरुपाच्या होत्या. तर केवळ २७,४४० चाचण्या या RT-PCR स्वरुपाच्या होत्या. उर्वरित ८५० चाचण्यांसाठी वेगळ्या पद्धतींचा अवलंब झाला होता. मात्र, अँटीजेन आणि RT-PCR चाचण्यांचे गुणोत्तर १:१ असे हवे”.

“कारण, ६५ टक्के अँटीजेन चाचण्या फोल ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या निदानासाठी RT-PCR हाच अधिक विश्वासार्ह पर्याय असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. एका दिवसात ५४ हजारपेक्षा जास्त RT-PCR चाचण्या करण्याची आपली क्षमता आहे. राज्य सरकारने ही क्षमता पूर्णपणे वापरावी. कोरोनाच्या आकडेवारी लपवण्यापेक्षा किंवा तिचे व्यवस्थापन करण्याऐवजी राज्य सरकारने ठोस वैज्ञानिक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा”, असा टोलाही यावेळी फडणवीस यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संरक्षणमंत्री राजनाथसिंग १० वाजता करणार मोठी घोषणा !

News Desk

‘विप्रो’ कडून पुण्यात हिंजवडी येथे विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी

News Desk

भाजपच्या आमदार-खासदारांमध्येच अंतर्गत मतभेद, पडळकरांची संजय पाटलांवर टीका

News Desk