HW News Marathi
Covid-19

मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे ! मृत्यूदर ५.५ टक्क्य़ांवर पोहोचला 

मुंबई | मुंबईत गेल्या २४ तासांत १०६६ नवे रुग्ण आढळले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण बाधितांचा आकडा १ लाख २० हजारांच्या पुढे गेला असून, कोरोनामुक्तांची संख्या ९६ हजारांवर गेली आहे. याचाच अर्थ मुंबईत जवळपास ७८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, मृतांची एकूण संख्या ६७९६ झाली असून, मृत्यूदर ५.५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.८१ टक्के आहे. तर, काही ठिकाणी रुग्णवाढीचा दर अधिक आहे. आणि रुग्ण दुपटीचा कालावधी ३ महिन्यापर्यंत पोहोचला आहे.काल (९ ऑगस्ट) १०६६ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण बाधितांचा आकडा १,२३,३९७ वर गेला आहे. तर एका दिवसात १२३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ९६,५८६ म्हणजेच ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली असून १९,७१८ रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात २४ तासांत तब्बल ८१,४४६ नवे रुग्ण, परिस्थिती चिंताजनक!

News Desk

दिलासादायक ! महाराष्ट्रातील पहिले दोन पाॅझिटिव्ह रूग्ण झाले निगेटिव्ह

Arati More

आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राला सांगा !

News Desk