HW News Marathi
Covid-19

आता तरी जागे व्हा ! फडणवीसांचा आघाडी सरकारला सल्ला 

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून कोरोना संदर्भात पालिकेवर आणि आघाडी सरकारवर टीका करत आहेत. याआधी देखील त्यांनी मुंबईमध्ये मृत रुग्णांचा आकडा लपवला जात आहे असे म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करत कोरोनाची आकडेवारी मांडली आहे.

“महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा दर सुरुवातीला ६ ते ७ टक्के होता, तो ८ जूनपर्यंत १७ ते १८ टक्क्यांवर आला आणि आता २३ ते २४ टक्के म्हणजे १०० चाचण्यांमागे २४ जणांना कोरोनाची लागण होते” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या ट्वीटमध्ये फडणवीसांनी महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण, पॉझिटिव्ह रुग्ण, रुग्णांची टक्केवारी आणि कोरोनाबळींची आकडेवारी जोडली आहे.

“मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर २१ ते २७ टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अद्यापही अतिशय कमी आहे. १ ते १९ जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी दररोज केवळ ५५०० चाचण्या. महाराष्ट्र आणि मुंबईतील चाचण्यांची संख्या दररोज सरासरी तेवढीच” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस दलातील चौथा बळी

News Desk

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टातील ‘ती’ याचिका मागे

News Desk

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk