HW News Marathi
महाराष्ट्र

“बारमध्ये गर्दी चालते मग अधिवेशन का नको?”, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई। ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या किंवा भूमिका या राज्य सरकारकडून केल्या जातात, कोरोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा डावपेच आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?, असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अधिवेशन आल्यावरच कोरोनाचं कारण कसं दिलं जातं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अधिवेशनाची तारीख ठरवण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. पण, केवळ ५ आणि ६ जुलैला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय अधिवेशनात प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी न घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत केला. त्यानंतर मीडियासमोर येऊन त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या येतात किंवा राज्य सरकारकडून तशा भूमिका मांडल्या जातात. कोरोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

लोकशाही बासनात गुंडाळली जातेय

फक्त दोन दिवसाच्या अधिवेशनात राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा कशी करणार? विशेष अधिवेशन करण्याची गरज असताना आहे ते अधिवेशनही घेणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे. लोकशाही बासनात गुंडाळायची सरकारची कार्यपद्धती आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काहीच भूमिका नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर काहीच भूमिका नाही. त्यासाठी विशेष अधिवेशन नाही. संसदीय लोकशाहीत ही गंभीर बाब आहे. अर्निबंध प्रशासन आणि मंत्री यांच्यावर प्रश्न विचारायचेच नाहीत का?, संतप्त होत फडणवीसांनी हे सवाल उपस्थित केले.

एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालतं. मग अधिवेशन का नाही, असा प्रश्न करत विरोधी पक्षाने विधीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. लोकशाहीची थट्टा सुरु असल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असं सांगतानाच दोन दिवसाचं अधिवेशन म्हणजे सामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आम्ही याबाबत रस्त्यावर उतरून जाब विचारू. आम्ही काय करणार हे लवकरच सांगू पण शांत बसणार नाही. लोकशाहीच्या संकेताला हरताळ फासला जात असेल तर आम्हालाच जनतेचा आवाज बनावा लागेल, असंही माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तुम्ही जोडे मारा, हार घाला, पण…

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होतय अस देखील देवेंद्र फडणविस म्हणालेत. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन होऊच नये, यासाठी कोरोनाचं कारण दिलं जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केलाय,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक; ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

Aprna

विजेचा धक्याने शेत-यांचा मृत्यू

News Desk

डोंगरांतील गावांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करा, रामदास आठवलेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी!

News Desk