HW News Marathi
महाराष्ट्र

“पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा”, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!

कोल्हापूर | कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज ( राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. त्यांनी समोरासमोर एकमेकांची भेट देखील घेतली. अशा प्रकारे दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असल्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली असली, तरी या परिस्थितीत तातडीने पॅकेज जाहीर व्हावं की अभ्यासाअंती मदत जाहीर व्हावी, यावर मात्र दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत “मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे”, असा टोला फडणवीसांना लगावला असताना, फडणवीसांनी देखील त्यावर पलटवार केला आहे.

पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचा पाहणी दौरा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांकडून केल्या जाणाऱ्या पॅकेजच्या घोषणेच्या मागणीविषयी विचारणा केली असता “मी पॅकेज जाहीर करणारा नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर लगेचच झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता फडणवीसांनी देखील लागलीच पलटवार केला. “आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

उशीर तर झाला आहे, पण आता तरी…

“नुकसान झाल्यानंतर तातडीची मदत राज्य सरकारकडून यायला हवी होती. ती अद्याप आलेली नाही. नागरिक सातत्याने २०१९च्या मदतीचा उल्लेख करत होते. तेव्हा रोखीनं तात्काळ मदत करण्यात आली होती. एखादी आपत्ती आल्यानंतर त्यानंतरचा महत्त्वाचा काळ असतो, ज्यात तातडीची कामं करावी लागतात. घरांमध्ये, दुकानांमध्ये चिखल घुसतो, सर्व वस्तू ओल्या झाल्या असतात. अंतर्वस्त्रापासून सर्व गोष्टी लोकांना आणाव्या लागतात. अशा परिस्थितीत ही तातडीची मदत आवश्यक असते. त्या कुटुंबाकडे तेवढेही पैसे नसतात. सरकारने अद्याप ती मदत दिलेली नाहीत. उशीर झाला आहे. पण आता तरी सरकारने ती मदत करावी, अशी आमची अपेक्षा आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटायला बोलावलं आहे, आम्ही सूचना करूच, पण…

“आज या पुराच्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे २०१९च्या पुराचा अभ्यास करून त्याचा एक प्रस्ताव आम्ही जागतिक बँकेला पाठवला होता. इथलं पुराचं पाणी दुष्काळी भागाकडे कसं नेता येईल, यासाठी आम्ही केंद्रीय विभागाची देखील मदत घेतली होती. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्याची माहिती काढली होती. हे पुराचं पाणी दुष्काळी भागाकडे वळवता येतं. २५ नोव्हेंबरला आम्ही ३५०० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. जागतिक बँकेच्या टीमने त्याला तत्वत: मान्यता दिली होती. आता तो प्रस्ताव पुढे नेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं आहे. त्यावेळी आम्ही या सूचना मांडूच. पण पुरावर हाच दीर्घकालीन उपाय आहे. बॅकवॉटरमुळेच लोकांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यावर काम करण्याची विनंती आम्ही सरकारला करणार आहोत. त्यासोबतच तात्काळ मदत करणं गरजेचं आहे, अशी मागणी आम्ही करतो”, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे! – उद्धव ठाकरे

काही दिवसाांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला. आणि यामध्ये प्रचंड नागरिकांनी आपला जीव गमावला, तर काहींना बेघर व्हावं लागले, यानंतर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. कोल्हापुरात २०१९नंतर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा दिला आहे. तर यावेळी उद्धव ठाकरे असं देखिल म्हणाले की मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे.

कायमस्वरूपी इलाज महत्त्वाचा

“काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणं शक्य आहे, ते आपण करू शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, की यापुढे आता बांधकामं करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारूच नका. मग जे व्हायचं, ते होऊ द्या. पण असं आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज करणं हा महत्त्वाचा भाग आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अशा गावांचंही पुनर्वसन करावं

आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तोडगा काढायचा असेल, तर येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्याचा आराखडा बनवून काम सुरू करावं लागेल. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यांचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने पूरबाधित भागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं ही बाब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावांचंही पुनर्वसन करावं लागणार आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब घेणार पुन्हा बैठक!

News Desk

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे

News Desk

मुंबई-पुण्याच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

News Desk