HW News Marathi
महाराष्ट्र

कुक्कुटपालन करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची फडणवीसांची मागणी  

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनानंतर आता बर्ड फ्ल्यूचं संकट ओढावले आहे. बर्ड फ्लूचं संकट मोठं आहे. या साथीला थोपवायचं असेल तर वेळीच खबरदरादी घ्यावी लागेल. मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना अजून कोणतीही मदत मिळाली नाही. अजून ऑडिटही झालेलं नाही, असं म्हणत हे सरकार अतिशय टोलवाटोलवी करणारं असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. केंद्र सरकारने आरोग्य सेवेच्या बाबतीत माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्याप्रमाणे काम करण्याचा सल्ला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना या विषयावर मी काहीही बोलणार नसल्याचे म्हणत राज्यात आरोग्यमंत्री कुणाचे आहेत?, असा खोचक सवाल शिवसेनेला केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल !

News Desk

बैलगाडी नदीत पडून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू 

News Desk

पारोळात घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

News Desk