HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसही आता करणार अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी

मुंबई | राज्यात अवेळी आलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौरा करणार आहेत. १९- २२ ऑक्टोबर या काळात ते दौऱ्यावर असणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधून सुरुवात होणार आहे.

१९ ऑक्टोबरला बारामतीमधून दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर ते कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा या परिसराचा दौरा करत उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर २० तारखेला देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तर २१ ऑक्टोबरला हिंगोली, जालना आणि औरंगाबादचा दौरा करतील. या ३ दिवसांत देवेंद्र फडणवीस ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० किमीचा प्रवास करणार आहेत.

आजच (१७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मरावाड्याला २ दिवसांच्या दौऱ्यासाठी गेले आहेत. आणि आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दौरा करणार त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या उपमहापौरपदी RPI च्या सुनिता वाडेकर यांच नाव निश्चित

News Desk

रोहित पवारांनी केली पडळकरांची तक्रार थेट मोदी आणि नड्डांकडे

News Desk

कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा !

swarit